सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
तालुक्यातील डाबली धांदरणे येथील चाळीस भाविक तब्बल 15 वर्षापासून येथील भाविक दर पंधरा दिवसांनी एकादशीला टाळ मृदंग विना खांद्यावर भगवा पताका घेऊन हरिनामाच्या गजराने दर एकादशीला डांबली ते विखरण 30की हि अंतर पायी दिंडीची परंपरा गोपीचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून ते डाबली धादरणे होळ चिरणे कदाने भडणे सोनशेलू मार्गे विखरण येथील द्वारकाधीश मंदिरात पोहोचतात तेथे भगवंताचे दर्शन व भजन करून पुन्हा मार्गस्थ आपल्या गावाकडे रवाना होतात या दिंडी सोहळ्यातही कितीही संकटे पाउस वारा आला तरीही गावकऱ्यांनी आजही दर पंधरा दिवसांची दिडीची परंपरा चालू ठेवली असल्याने त्यांना भडणे येथील छोटू लोहार रमेश पाटील यांच्या कडे चहा पाणी चा कार्यक्रम होतो भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी आपल्या शेतात एकादशीला फराळ तसेच शाल श्रीफळ टोपी रुमाल पुष्पगुच्छ वारकऱ्याचा देऊन त्यांच्या माजी आमदार रामकृष्ण पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक जगताप किशोर बागुल समता परिषद जिल्हा युवा अध्यक्ष योगेश बागुल भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी त्यांचा शाल टोपी रुमाल फराळ वाटप करून श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मान करून दिंडीला निरोप दिला यावेळी कृष्णा पाटील आप्पा पाटील सोनू पाटील दीपक माळी उपस्थित होते,पंधरा वर्षांपासून दर पंधरा दिवसांनी एकादशीला येथील भाविक पायी दिंडी सोहळा उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतुकीतिहि संकट आली ती नियमित वारी चालू आहे यांच्या कौतुक व सन्मान व्हावा या उद्देशाने प्रत्येक वारीत जाणाऱ्या भाविकांचा सन्मान केला
![]()
